Saturday, April 27, 2024
Homeराजकीय‘करोना’ नुसत्या जाहिराती करून संपणार नाही

‘करोना’ नुसत्या जाहिराती करून संपणार नाही

मुंबई – देशात करोनाच्या दुसर्‍या लाटेने देशभरात थैमान घातले आहे. यावरुन राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. करोना परिस्थिती लक्षात घेता एक देश एक निती हा कार्यक्रम ठरवण्याची गरज असताना नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून करोना संपणार नाही, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

ते म्हणाले, भाजपशासित उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये करोना मॅनेजमेंट जाहिरातीमध्ये आहे. जितके पैसे जाहिरातीवर खर्च करण्यात येत आहे. तेवढा पैसा करोनावर खर्च केला असता तर प्रत्येक गावात लोकांचा मृत्यू झाला नसता,

- Advertisement -

करोना रोखणं हे एकट्या मोदींचं काम नाही, हे मी आधीपासून बोलतोय. सर्वपक्षीय बैठक बोलवा. जर सर्वजण कामाला लागले तर आठ महिन्यात करोनावर नियंत्रण मिळविता येईल. आता ज्या पद्धतीने काम सुरू आहे. विशेषत: भाजप शासित राज्यात. ते पाहता येत्या दोन चार वर्षात तरी करोना संपणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली. केंद्र सरकारकडून कोविड कंट्रोल होत नाही याबाबत कुणाच्याही मनात ही शंका राहिली नाही. सुप्रीम कोर्टाने टास्क फोर्ससाठी निर्णय घेतलाय, जी कामं सरकारला करायला हवी ती सुप्री कोर्ट करतंय, याचा अर्थच आहे की मोदी जबाबदारी पार पाडण्यात असमर्थ आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयाने ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून नॅशनल टास्क फोर्स स्थापन केला आहे. त्यावरूनही मलिक यांनी केंद्राला चिमटे काढले. केंद्र सरकारला करोना परिस्थिती हाताळता येत नाही, याबाबत कुणाच्याही मनात शंका राहिलेली नाही. देशातील सात हायकोर्टाने वेगवेगळे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टानेही टास्क फोर्स निर्माण करण्याचा निर्णय घेतलाय. जी कामे केंद्र सरकारला करायची आहेत ती केंद्राकडून होत नसल्याने न्यायालयाच्या आदेशाने होत आहेत. याचा अर्थ सरकार जबाबदारी पार पाडण्यात कमी पडते आहे, असेही मलिक म्हणाले.

सर्व पक्षीय बैठक बोलवा

यावेळी त्यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये करोना मृतदेहांवर नदीत अंत्यसंस्कार करण्यात येत असल्यावरूनही केंद्र सरकारवर टीका केली. उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये शव दाहिन्यांमध्ये जात नाहीय तर नदीमध्ये अंत्यसंस्कार केले जात आहेत ही परिस्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण देशात एक धोरण बनवले नाही तर करोना देशातून हद्दपार होणार नाही अशी भीती व्यक्त करतानाच मोदीसरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि योग्य ते धोरण ठरवावे, असेही मलिक म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या