मुंबई | Mumbai
काल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), भाजप (BJP) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर कडाडून टीका केली. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे...
ते म्हणाले की, उद्धव ठाकरे हे आयत्या बिळावर नागोबा आहेत. लबाड लांडगा, यांच्यासारखा खोटारडा माणूस मी पाहिला नाही. उद्धव ठाकरेंनी किती मराठी लोकांना रोजगार दिला. काल जे काही बोलले आहेत, खोका, गिधाडं बोलतात, आत जाल. संजय राऊतांची सोबत करायला. खोक्याची चौकशी होणार आहे, यांच्या मागे ईडी लागणार आहे, असा इशाराच त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
ते पुढे म्हणाले की, मला भाजपात घेऊ नये म्हणून उद्धव ठाकरे अमित शहांना कालपर्यंत फोन करत होते. त्याच अमित शहांवर तुम्ही गिधाडं वगैरे टीका करता. चांगले बोलता येत नाही काय? बाळासाहेबांची एकनाथ शिंदे, आमदार आठवण काढतात, त्याला चोरी कसे काय म्हणू शकता. साहेब असे नव्हते, ते मोठ्यांचा आदर करायचे. उद्धव ठाकरे चार खासदार, दहा आमदार निवडून आणू शकत नाही. पदासाठी आणि पैशांसाठी आणि खोक्यासाठी हिंदुत्वाशी गद्दारी केली.
अमित शहा (Amit Shah) मुंबईवर चालून आले असे म्हणता, देशाचा गृहमंत्री मुंबईत आला तर मुंबई तुमची आहे का? कलानगरला टक्केवारीसाठी ऑफिस उघडले. पालिकेच्या टेंडरमागे १५ टक्के घेत होते. आता आम्हाला ठेकेदारांनाच समोर आणावे लागेल, असा आरोप राणे यांनी केला.