Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यानिवडणूक विजयानंतर भाजपकडून महागाईची भेट; नाना पटोलेंची टीका

निवडणूक विजयानंतर भाजपकडून महागाईची भेट; नाना पटोलेंची टीका

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

पेट्रोल (Petrol), डिझेल (Diesel) आणि एलपीजी गॅसच्या (LPG Gas) दरात (Price) केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) वाढ करून सामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे….

- Advertisement -

आधीच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला पुन्हा एकदा भाजपने (BJP) महागाईच्या गर्तेत लोटले आहे. निवडणुकीचे (Election) दिवस असताना इंधन दरवाढ (Fuel Price Hike) रोखून ठेवली होती. पण पाच राज्यातील विधानसभा निवडणूक संपताच भाजपने जनतेला महागाईची भेट दिली, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मंगळवारी प्रसारमध्यामांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली.

सततच्या इंधन दरवाढीवर भाजप नेते गप्प का? असा सवालही त्यांनी केला. केंद्रात भाजपचे (BJP) सरकार आल्यापासून सातत्याने पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलाचे दर वाढत आहेत. आज एलपीजी गॅस सिलिंडरमध्ये ५० रुपये तर पेट्रोल, डिझेलमध्ये ८० पैशांची वाढ केली. आधीच पेट्रोल, डिझेल प्रति लिटरचा दर शंभर रुपयांपेक्षा जास्त आहे.

तर गॅस सिलिंडर एक हजाराच्या जवळ पोहचला आहे. रशियाकडून (Russia) कच्चे तेल सवलतीच्या किमतीत घेऊनही इंधन दरवाढ केली आहे. डिझेलची ठोक खरेदी करणारे रेल्वे, एसटी महामंडळ, उर्जा प्रकल्प, सिमेंट उत्पादन, मॉल्स यांच्यासाठीचे डिझेल २५ रुपये प्रती लिटरने महाग केले. यामुळे महागाई वाढून त्याचा फटकाही शेवटी सामान्य माणसांनाच बसणार आहे, असे पटोले म्हणाले.

एकीकडे नागरिकांचे उत्पन्न घटत असताना दुसरीकडे महागाई मात्र वाढत असून सामान्य जनतेला हा दुहेरी मार आहे. निवडणुकीच्या प्रचारात एलपीजी गॅस मोफत देण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी दिली होती. पण निवडणुका होताच मोफत गॅस तर सोडाच उलट आहे त्याच गॅसची किंमत वाढवली आहे.

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप पराभूत होताच पट्रोल, डिझेलचे दर कमी केले होते. परंतु विधानसभा निवडणुकीत विजय होताच महागाईची भेट दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपचे नेते महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था यासारख्या ज्वलंत प्रश्नावर मूग मिळून गप्प बसतात आणि हिजाब, हिंदू- मुस्लीम, पाकिस्तान, जीना, या प्रश्नावर आकांडतांडव करून जनतेचे लक्ष मुख्य मुद्द्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या