Monday, April 29, 2024
Homeराजकीयमुंबई महापालिका निवडणुकीत नारायण राणेंमुळे शुन्यही तोटा होणार नाही - निलम गोऱ्हे

मुंबई महापालिका निवडणुकीत नारायण राणेंमुळे शुन्यही तोटा होणार नाही – निलम गोऱ्हे

पुणे |प्रतिनिधी| Pune

हार की प्रहार? प्रहार मधील ‘प्र’ कधीच निघून गेला आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या मुखपत्राचं नाव हार ठेवावं, असा खोचक टोला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी राणे यांना लागवला आहे. दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीत नारायण राणेंमुळे शुन्यही तोटा होणार नाही, राणे यांनी समतोल राखून बोललं पाहिजे, असा इशाराही गोऱ्हे यांनी दिला आहे.

- Advertisement -

एका दैनिक मधून नारायण राणे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. नारायण राणेंच्या या टीकेला उत्तर देताना निलम गोऱ्हे

किरीट सोमय्या यांच्यावरही गोऱ्हेंनी खोचक टीका केली. सोमय्या हे कर्णबधिर आणि दृष्टीहीन आहेत. ते पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संदर्भात चौकशी करण्याची मागणी करणार नाहीत. खासदार संजय राऊत यांनी जी भूमिका घेतली तीच माझी भूमिका आहे, असं त्या म्हणाल्या.

रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबत बोलताना महिला आयोगाला अध्यक्षपद मिळालं ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र, हे पद सर्वधर्म समभावाचं आहे. पक्षाची राजकीय भूमिका असते. मात्र, ती बाजूला ठेवून त्या काम करतील अशी आशा गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या