मोदी सरकारचा GST म्हणजे "गब्बर सिंह टॅक्स"!

राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
मोदी सरकारचा GST म्हणजे "गब्बर सिंह टॅक्स"!

दिल्ली | Delhi

काही दिवसांपासून काँग्रेस नेते व माजी अध्यक्ष राहुल गांधी सरकार विरोधात चांगलेच आक्रमक झाले आहे. त्यांनी आज ट्विट करत मोदी सरकार वर टीका केली आहे. GDP घसरणीला मोदी सरकारचा GST कारणीभुत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. तसेच त्यांनी म्हंटले आहे,

तसेच "जीएसटीत आलेल्या घसरणीचं मोठं कारण मोदी सरकारचं "गब्बर सिंह टॅक्स" हा आहे. जीसटीमुळे देशातील गरीब, लघु उदयोग, लघु तसेच मध्यम व्यवसाय आणि शेतकरी तसेच मोलमजुरी करणाऱ्या अशा लोकांवर याचा मोठा फटका बसला आहे. अनेकांचे रोजगार गेले आहेत. सोबतच लघु व्यवसाय ठप्प झाले असून, लाखों तरुणांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. तसेच कित्येक राज्याची अर्थव्यवस्था सुद्धा विस्कळीत झाली आहे." तसेच "जीएसटी म्हणजे आर्थिक सर्वनाश" असा ट्विट राहुल गांधी यांनी केला असून, त्याद्वारे त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com