Friday, April 26, 2024
Homeराजकीयउद्धव ठाकरे हात हलवत आले, त्यांच्या मनात पाप - विनायक मेटे

उद्धव ठाकरे हात हलवत आले, त्यांच्या मनात पाप – विनायक मेटे

पुणे (प्रतिनिधि) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील बैठकीनंतर मराठा आरक्षणाबद्दल नेमकी काय चर्चा झाली आहे याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही सांगितले नाही. ते तेथून हात हलवत आले असून, त्यांच्या मनात पाप आहे,” अशी टीका शिवसंग्राम संघटनेचे नेते आमदार विनायक मेटे यांनी केली आहे. दरम्यान, ‘आता पुढील काळात राज्यातील अनेक ठिकाणी बैठका, मोर्चे आयोजित करून सरकारला जाब विचारणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात १५ तारखेला पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. त्याचबरोबर मुंबईत दुचाकी मोर्चा काढणार आहे असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मेटे म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र त्या बैठकीत नेमकं काय चर्चा झाली किंवा मराठा समजाला काय मिळालं. मुख्यमंत्र्यांनी अद्यापपर्यंत सांगितलं नाही. त्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलावं. ”

- Advertisement -

“मराठा आरक्षणाचा निर्णय न्यायालयाने रद्द करून, जवळपास महिना होऊन गेला, तरी देखील सरकार न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करू शकलेले नाही. यामधून सरकारची मानसिकता दिसून येत असल्याची कोपरखळी त्यांनी सरकारला लगावली.

- Advertisment -

ताज्या बातम्या