Saturday, April 27, 2024
Homeराजकीयनारायण राणे म्हणतात, मुख्यमंत्री ठाकरेंना महाराष्ट्र सांभाळता येईना आणि चालले...

नारायण राणे म्हणतात, मुख्यमंत्री ठाकरेंना महाराष्ट्र सांभाळता येईना आणि चालले…

मुंबई | Mumbai –

भाजपा खासदार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. Chief Minister Uddhav Thackeray

- Advertisement -

महाराष्ट्र सांभाळता येत नाही आणि देशातील दुसरी राज्य सांभाळायला चालले आहेत अशी टीका त्यांनी केली आहे. नारायण राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा टोला लगावला आहे. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राष्ट्रीय नेतृत्त्वाची मानसिकता असल्याचं म्हटलं होतं. त्यावरुनच नारायण राणे यांनी ही टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राष्ट्रीय नेतृत्त्वाची मानसिकता आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीत केंद्र सरकारला घाबरायचं की विरोधात लढायचं हे ठरवा असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राने आता राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवायला पाहिजे असं म्हटलं.

उद्धव ठाकरे कधीही आडपडदा ठेवून बोलत नाही. पोटात एक आणि ओठावर दुसरं असं कधीच नसतं. उद्धव ठाकरेंनी केंद्राविरोधात लढण्याची तयारी करताना बिगरभाजप राज्यांना आवाहन केलं आहे. या सगळ्यांचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय स्तरावर करावं असं माझं मत आहे. उद्धव ठाकरेंची राष्ट्रीय नेतृत्त्वाची मानसिकता होताना मला दिसत आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

- Advertisment -

ताज्या बातम्या