
मुंबई | Mumbai
विधान परिषद निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. निवडणुकीत भाजपने गुलाल उडवला आहे. प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड हे भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत...
तर शिवसेनेचे सचिन अहिर, आमशा पाडवी, राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर, काँग्रेसचे भाई जगताप हे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले आहेत.
दरम्यान, विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. 10 जागांसाठी 11 उमेदवार मैदानात होते. गुप्त मतदान असल्यामुळे कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार याची कमाली उत्सुकता होती. विधान परिषदेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्व सूत्र आपल्या हातात घेतली होती.
त्यांनी सर्व आमदार आपल्याच देखरेखीखाली ठेवली होती. मतदानाच्या दिवशीदेखील मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांशी चर्चा करूनच मतदानाला पाठवले होते. यावेळी शिवसेनेने कोणताही दगाफटका नको म्हणून आपल्याच आमदारांच्या संख्याबळावर आपले उमेदवार विजयी करण्यावर भर दिला होता. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेसाठी तयार केलेला प्लान यशस्वी ठऱला आहे आणि भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत.