मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड यांना हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पडल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर ३५४ कलमांतर्गत आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच कारणामुळे ७२ तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केले म्हणत आव्हाड यांनी एक मोठी घोषणा केली आहे….
त्यांनी ट्विट करत म्हटले आहे कीम, मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे. मी या पोलिसी अत्याचाराविरोधात लढणार आहे. मी लोकशाहीची हत्या झालेली पाहू शकत नाही, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासांत २ खोटे गुन्हे दाखल केले. यातील एक गुन्हा हा ३५४ कलमांतर्गत आहे. मी या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार आहे. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
‘धर्मवीर’च्या दुसऱ्या भागाच्या शूटिंगला सुरुवात?