Thursday, April 25, 2024
Homeराजकीय'हिंमत असेल तर भाजपने मला अटक करावी'; ममता बॅनर्जी यांचे भाजपला आव्हान

‘हिंमत असेल तर भाजपने मला अटक करावी’; ममता बॅनर्जी यांचे भाजपला आव्हान

दिल्ली | Delhi

पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकाचे पडसाद आतापासूनच उमटायला लागले आहेत. भाजपनं पश्चिम बंगाल निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केल्यानंतर ममता बॅनर्जींनीही भाजपला थेट आव्हान दिले आहे.

- Advertisement -

भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आपल्याला अटक करून दाखवावी, आपण तुरुंगात राहूनही तृणमूल काँग्रेसला विजय मिळवून देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ममता बॅनर्जी आज बांकुडा येथे जाहीर सभेत बोलत होत्या.

ममता बॅनर्जी सभेत बोलतांना म्हणाल्या, ”मी भाजपला स्पष्टपणे सांगतेय. मी भाजपाच्या एजन्सींना (केंद्रीय तपास यंत्रणा) घाबरत नाही. जर त्यांच्यात हिंमत असेल, तर मला अटक करून तुरूंगात टाकून दाखवावं. मी तुरूंगातून निवडणूक लढेन आणि तृणमूलला जिंकूनही देईन,” अशी गर्जना ममतांनी केली. “राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनाही तुरूंगात टाकलं. पण त्यांनीही सन्मानजनक विजय संपादित केला. बिहारमध्ये सत्तेत येण भाजपाच्या फोडाफोडीचे परिणाम आहेत. हा जनादेश नाही,” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. आमदारांच्या घोडेबाजाराचा मुद्दा उपस्थित करत ममता म्हणाल्या,”भाजपा राजकीय पक्ष नाही, तर खोट्याचा कचरा आहे. जेव्हा जेव्हा निवडणुका येतात, तेव्हा तेव्हा तृणमूलच्या नेत्यांना धमकावण्यासाठी ते नरादा प्रकरण, शारदा चिटफंड घोटाळा काढतात. पक्षांतर करण्यासाठी भाजपा तृणमूलच्या आमदारांना पैशांचं प्रलोभन दाखवत आहेत. भाजपा देशाला मिळालेला शाप आहे,” असा आरोप ममता बॅनर्जींनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या