दिल्ली | Delhi
काँग्रेस चे माजी अध्यक्ष राहुल गांधी मोदी सरकारवर टीका करण्यासाठी कोणतीही संधी सोडताना दिसत नाहीये. आज त्यांनी सरकारवर देशातील ‘बेरोजगारी’ या मुद्द्यावरुन पुन्हा ट्विट करत टीका केली आहे.
त्यांनी एक व्हिडिओ ट्विट करत म्हंटले आहे, “जेव्हा मोदी पंतप्रधान बनले होते तेव्हा त्यांनी देशातील युवकांना २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, मोठे स्वप्न दाखवले होते. पण नरेंद्र मोदींच्या धोरणामुळे १४ करोड लोकांना बेरोजगार बनवले.” तसेच त्यांनी सरकार विरुद्धच्या “रोजगार दो” आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.