Friday, April 26, 2024
Homeराजकीयगेल्या दहा वर्षांपासून NDA केवळ नावालाच

गेल्या दहा वर्षांपासून NDA केवळ नावालाच

दिल्ली | Delhi

कृषी विधेयकाच्या मुद्द्यावरून मतभेद झाल्याने NDA चा घटक पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने NDAतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल (Sukhbir Singh Badal) यांनी NDA वर जोरदार टीका केली आहे. NDA फक्त नावाला असल्याची कणखर टीका मोदी सरकारवर केली आहे.

- Advertisement -

सुखबीर सिंग बादल बोलतांना म्हणाले, “नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीची विश्वसनियता उरलेली नाही. NDA फक्त नावाला आहे. मागच्या सात, आठ, दहा वर्षापासून NDA फक्त नावाला आहे. NDA मध्ये काही नाही. NDA मध्ये कुठली चर्चा होत नाही, काही प्लानिंग नाही किंवा कुठली बैठक होत नाही. मागच्या दहा वर्षात पंतप्रधानांनी त्यांच्या मनात काय आहे? यावर चर्चा करण्यासाठी लंचला एनडीएची बैठक बोलावल्याचे मला आठवत नाही.” तसेच “आघाडी फक्त कागदावर असू नये. यापूर्वी वाजपेयी यांच्याकाळात NDA मध्ये योग्य पद्धतीने संबंध जपले जायचे. माझे वडिल NDA चे संस्थापक सदस्य आहेत. राज्यामध्ये आम्ही नेहमीच भाजपाला सोबत घेतले आहे. माझे वडिल प्रकाश सिंग बादल यांनी ज्या पद्धतीने आघाडी चालवली, तसा कारभार असला पाहिजे. प्रत्येक निर्णयासाठी ते भाजपाला बोलवायचे. आम्ही जेव्हा, कधी राज्यपालांना भेटायला गेलो, भाजपा आमच्यासोबत असायची. राज्य पातळीवर आम्ही मोठे होतो, तरीही आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना विश्वासात घ्यायचो.” असे सुखबीर सिंग बादल यांनी म्हंटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या