राजस्थान | Rajsthan
राजस्थानमध्ये सध्या अनेक राजकीय नाट्य सुरु आहे. त्यातच राजस्थानचे राज्यपाल कालराज मिश्रा यांनी विधानसभा अधिवेशन बोलण्यास सहमती दर्शविली असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.
राज्यपाल कालराज मिश्रा यांनी मंत्रिमंडळाची मागणी मान्य करत विधानसभेचे अधिवेशन बोलवले आहे. या आधी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी नुकतेच राज्यपालांच्या ‘वागणुकी’ बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चा केली होती. तसेच राज्यपाल लोकशाही बिघडव असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला होता.