<p><strong>जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :</strong></p><p>भाजपचे माजी उपमुख्यमंत्री स्व.गोपीनाथ मुंडे असते तर आज राजकारणाची दिशा वेगळी राहिली असती, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शनिवारी भावुक होऊन केले. </p>.<p>श्री.खडसे यांनी आपल्या मुक्ताई निवासस्थानी आज स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी केली. त्यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केले. </p><p>त्यानंतर पत्रकरांशी वार्तालाप करताना एकनाथराव खडसे म्हणाले की, गोपीनाथराव मुंडे यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणाची दिशा बदलली असून त्यांना जाऊन आज 6 वर्षे झाली.</p><p> या काळात एकही दिवस असा नाही की त्यांची आठवण झाली नाही. ते आयुष्यभर गरीब आणि दुर्बलांसाठी काम करत राहिले. त्यांचे कार्यकर्त्यांवर प्रेम होते म्हणून कार्यकर्ते जुळत राहिले. </p><p>ते अचानक गेल्याने मोठी हानी झाली. ते होते तोपर्यंत राज्याच्या राजकारणाची दिशा वेगळी होती. आज गोपीनाथराव मुंडे असते तर राजकारणाची दिशा वेगळी राहिली असल्याचे त्यांनी सांगितले.</p>