<p><strong>जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :</strong></p><p>पक्षात प्रवेश करतांनाच नाथाभाऊंनी ईडीच्या नोटीसबाबत सांगितले होते. राजकीय द्वेशातून त्यांना ईडीकडून त्यांना नोटीस बजाविण्यात आली.</p>.<p>नाथाभाऊ त्या नोटीसीला कायदेशीररित्या सक्षमपणे उत्तर देतील. तसेच प्रफुल्ल लोढा हा पक्षाचा सभासद देखील नसून त्याच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे राष्ट्रीवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रभैय्या पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.</p><p>जिल्ह्याचे नेते एकनाथराव खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण बदलेले आहे. दररोज शेकडो तरुण पक्षात प्रवेश करीत असून भाजपाबद्दल राग व्यक्त करीत आहे. </p>.<p>महिनाभरापासून जिल्ह्यातील काही संस्थांच्या चौकशी सुरु झाल्या आहेत. यात भाजपाचे नेते व कार्यकर्ते अडकले आहेत. राजकीय द्वेशातून ईडीकडून नाथाभाऊंना नोटीस मिळाली आहे.</p><p>या नोटीसीला नाथाभाऊ सक्षमपणे उत्तर देवून सहीसलामत बाहेर येतील असेही अॅॅड. रविंद्र पाटील यांनी सांगितले.</p>.<p><strong>लोढा पक्षाचा सभासदही देखील नाही</strong></p><p>प्रफुल्ल लोढांनी पत्रकार परिषद घेत पक्षाच्या नावाचा उल्लेख करुन नाथाभाऊंवर वैयक्तीकरित्या आरोप केले. त्याला आरोप करण्याचा काहीही संबंध नाही. </p><p>लोढा हा आमच्या पक्षाचा सभासद देखील नाही. त्याने पक्षाच्या सभासदाची पावती दाखवावी. अन्यथा त्याच्यावर पक्षाकडून अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे अॅड. पाटील यांनी सांगितले.</p>