अधिवेशनाला करोनाची अडचण, पण निवडणूक घेणे योग्य का ?

आ. जयकुमार रावल यांचा सवाल
अधिवेशनाला करोनाची अडचण, पण निवडणूक घेणे योग्य का ?

दोंडाईचा - Dondaicha - प्रतिनिधी :

राज्य सरकारने करोनामुळे अधिवेशन केवळ दोन दिवस घेण्याचा निर्णय घेतला आहे, तर दुसरीकडे पाच जिल्ह्यातील ओबीसीच्या रिक्त जागेवर निवडणुकीची घोषणा राज्याच्या निवडणूक आयोगाने केली आहे.

या निवडणुकीमुळे करोनाचा प्रसार होवू शकतो. यामुळे काही जीवितहानी झाली तर राज्य निवडणूक आयोगावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करू असा इशारा माजी मंत्री, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, आ. जयकुमार रावल यांनी दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com