धुळे – Dhule – प्रतिनिधी :
देशाच्या जडणघडणीत पंडीत जवाहरलाल नेहरुजींनंतर स्व. इंदिरा गांधींचे महत्वाचे योगदान असून देश इंदिराजी यांचे त्याग आणि बलिदान कदापी विसरु शकणार नाही.
देशविरोधी कायवाया करणार्या राष्ट्रांना धडा शिकविण्याचे काम खर्या अर्थाने इंदिरा गांधीनींच केले असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी केले.
आज दि.19 नोव्हेंबर रोजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती सुंदरसावित्री सभागृहात येथे साजरी करण्यात आली.
त्यावेळी श्री. पाटील हे बोलत होते. या कार्यक्रमाला काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, पं.स.चे माजी सभापती भगवान गर्दे, महिला काँग्रेस अध्यक्षा गायत्री जयस्वाल, अशोक सुडके, कृऊबा संचालक किर्तीमंत कौठळकर, सी.यु.पाटील, शिरुड माजी सरपंच दीपक पाटील, पं.स.माजी सदस्य छोटू चौधरी, जगदिश चव्हाण, सरपंच अरुण पाटील, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे, दिनेश पाटील मेहरगाव, संभाजी पाटील वडजाई, बापू खैरनार, हर्षल साळुंखे, हिंमत बाचकर, हरीष पाटील, संदिप पाटील, मनोज पाटील, संजय आव्हाड, शहर महिला काँग्रेस अध्यक्षा बानुबाई शिरसाठ, युवराज सुर्यवंशी, योगेश मासुळे, अजय पाटील, विनोद गर्दे, गोरख भदाणे आदी उपस्थित होते.