Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या“कृषी कायद्याप्रमाणेच अग्निपथ योजनाही...”; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

“कृषी कायद्याप्रमाणेच अग्निपथ योजनाही…”; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

दिल्ली Delhi

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांशी अग्निपथ योजनेवरुन (Agneepath Scheme) देशभरात निदर्शने होत आहेत. देशभरातील अनेक राज्यांतील तरुण अग्निपथविरोधात रस्त्यांवर उतरले आहेत. त्याचबरोबर या योजनेवरून राजकारणही चांगलेच तापले आहे.

- Advertisement -

आपल्या लाडक्या बाबांना ‘फादर्स डे’निमित्त शुभेच्छा द्या!

याच दरम्यान काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी यावरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना ‘माफीवीर’ असा टोला लगावला आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. ‘८ वर्षांपासून सातत्याने भाजपा सरकारने ‘जय जवान, जय किसान’ या मुल्यांचा अपमान केला आहे. मी यापूर्वी देखील सांगितलं होतं की पंतप्रधानांना काळे कृषी कायदे परत घ्यावे लागतील. त्याच पद्धतीने त्यांना ‘माफीवीर’ होऊन देशातील तरुणांची मागणी मान्य करावी लागेल आणि ‘अग्निपथ’ परत घ्यावे लागेल’ असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या