Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयभाजपा सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे; प्रियंका गांधींचा हल्लाबोल

भाजपा सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे; प्रियंका गांधींचा हल्लाबोल

दिल्ली l Delhi

दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलना दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर मोर्चात उफाळलेल्या हिंसचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

भाजपा सरकारकडून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे. पत्रकारांवर गुन्हे दाखल केले जात असल्यावरूनही त्यांनी टीका केली आहे.

प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे की, ‘शेतकरी आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना अटक केली जात आहे, त्यांच्यावर खटले दाखल केले जात आहेत. अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद केली आहे. भाजपा सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र ते हे विसरले आहेत की शेतकऱ्यांचा आवज जेवढ्या प्रमाणात दाबला जाईल, त्यापेक्षा जास्त प्रमाणात त्यांच्या अत्याचाराविरोधात आवाज उठतील.’

तसेच, ‘भाजपा सरकारद्वारे पत्रकार व लोकप्रतिनिधी विरोधात गुन्हे दाखल करून, त्यांन धमकावण्याचा प्रकार अत्यंत भयानक आहे. लोकशाहीचा सन्मान करणे ही सरकारची मर्जी नाही तर ती सरकारची जबाबदारी देखील आहे. भीतीचे वातावरण लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. भाजपा सरकारने वरिष्ठ पत्रकार व लोक प्रतिनिधींना धमकावण्यासाठी गुन्हे दाखल करून, लोकशाहीच्या सर्व मर्यादांचे उल्लंघन करण्यासारखं आहे.

दरम्यान, शेतकरी आंदोलनाचं वार्तांकन करणाऱ्य़ा मुक्त पत्रकार मनदीप पुनिया (Mandeep Punia) यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या विरोधात आईपीसी कलम 186, 323 आणि 353 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर पोलिसांशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. पुनिया यांच्यावर सिंघू बॉर्डरवरील दिल्ली पोलिसांचे एसचओशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. पुनिया यांच्यासह दुसरे पत्रकार धर्मेंद्र सिंह यांना देखील अटक करण्यात आली होती. मात्र, त्यांना आज सकाळी 5:30 वाजता सोडण्यात आलं आहे. तर दुसरीकडे पुनिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिल्ली पोलिसांच्या अतिरिक्त आयुक्तांनी याची पुष्टी केली आहे. धर्मेंद्र सिंह यांच्याकडून भविष्यात पोलिसांशी कोणतंही गैरवर्तन केलं जाणार नाही. असं लिखित स्वरुपात घेतल्यानंतर त्यांना सोडण्यात आलं आहे. तर मनदीप पुनिया यांना दुपारनंतर कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या