Wednesday, May 8, 2024
Homeराजकीय'भायखळ्याला पेंग्विन पहायला १६ फेब्रुवारीपासून याचचं हं!'

‘भायखळ्याला पेंग्विन पहायला १६ फेब्रुवारीपासून याचचं हं!’

मुंबई l Mumbai

येत्या १९ फेब्रुवारी रोजी राज्यभरात शिवजंयती साजरी केली जाणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजंयती साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन करत राज्य सरकारने नियमावली घालून दिली आहे. यावरून भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांनी देखील ठाकरे सरकारवर खोचक टीका केली आहे.

- Advertisement -

आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, “भायखळ्याला पेंग्विन पहायला १६ फेब्रुवारी पासून याचचं हं! सरकारचं असं आमंत्रण आलय बर का! पण खबरदार जर जयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला जमलात तर.. असे सरकारचे आदेश पण आलेत. त्यामुळे सांभाळा! अजब वाटले तरी नियम पाळा!! ठाकरे सरकार करेल, तेच नियम आणि तेच कायदे!!’

दरम्यान, १५ फेब्रुवारीपासून भायखाळा येथील राणीची बाग पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हा धागा पकडत आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला अवघ्या दहा लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी राज्य सरकारकडून काल देण्यात आली होती. त्यावर विरोधकांनी टीका केल्यानंतर अखेर राज्य सरकार बॅकफूटवर आले आहे. सरकारने अखेर नवी नियमावली जारी केली आहे.

दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी, असे गृहविभागाने परिपत्रकात म्हटले होती. त्यावर विरोधकांकडून टीका झाली. विरोधकांकडून टीका झाल्यावर १० जणांच्या उपस्थितीचा नियम सरकारने बदलला. त्याऐवजी १०० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे, असं त्यात म्हटलं आहे. तसेच, कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रैली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करावा.

- Advertisment -

ताज्या बातम्या