Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयबँकांनी पिककर्जासाठी शेतकर्‍यांना फिरवू नये !

बँकांनी पिककर्जासाठी शेतकर्‍यांना फिरवू नये !

दोंडाईचा – Dondaicha – प्रतिनिधी :

खरीप हंगाम जवळ आला आहे. पिक कर्जासाठी शेतकर्‍यांना बँकेत चकरा मारावयास लावत आहेत. यासाठी जिल्हाधिकार्‍यानी बँकर्सची बैठक घेवून शेतकर्‍यांना पिककर्ज सुलभ कसे मिळेल, याची कार्यवाही करण्याच्या सुचना द्याव्यात, अशी मागणी माजीमंत्री आ. जयकुमार रावल यांनी केली आहे.

- Advertisement -

करोनाच्या लॉकडाऊनमुळे बँकाची कामे बंद होती. त्यामुळे पिककर्ज नुतनीकरण करण्यासाठी तसेच पाच वर्षे पुर्ण झालेल्या शेतकर्‍यांना चकरा माराव्या लागत आहेत. त्यात पिककर्ज घेवून पाच वर्षे पुर्ण झालेल्या शेतकर्‍यांच्या स्टेट बँक ऑफ इंडीयामध्ये पिककर्ज असलेल्या शेतकर्‍यांच्या कर्ज फाईल मंजुरीसाठी धुळे येथे पाठवल्या जात आहेत.

धुळे येथे पाठवलेल्या फाईलला एक ते दीड महिन्यांवर कालावधी होवूनही अजूनही शेतकर्‍यांना पिककर्ज मंजूर होण्यास मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे हंगाम जवळ असूनही शेतीचे कामे सोडून शेतकर्‍यांना बँकांच्या चकरा माराव्या लागत आहेत.

शेतकर्‍यांनी आपल्या जवळील सर्व पैसे बँकेत भरून पिककर्ज भरले आहे. परंतु आता बियाणे, खते यासाठी शेतकर्‍यांना पैशांची गरज असतांना बँक त्यांना चकरा मारावयास लावत आहेत. यासाठी जिल्हाधिकार्‍यानी तातडीने बँकांची बैठक घेवून शेतकर्‍यांचे प्रकरणे सुलभ व लवकर कसे मंजूर होतील यासाठी सूचना कराव्यात, अशी मागणी आ. रावल यांनी केली आहे.

सर्च रिपोर्टसाठी दरपत्रक निश्चित करावे

पिककर्ज काढण्यासाठी शेतकर्‍यांना बँकानी निश्चित केलेल्या वकीलांकडुन सर्च रिपोर्ट काढावयास लावतात. त्यासाठी प्रत्येक वकिलाची फी ही वेगवेगळी आहे. वकिलांमार्फत अवाजवी दर आकारणी करून शेतकर्‍यांना लुटले जात असल्याच्या तक्रारी शेतकर्‍यांनी माझ्याकडे केली आहे.

या पार्श्वभूमीवर सरकारने अथवा जिल्हाधिकार्‍यानी सर्च रिपोर्टचे दर निश्चित करून त्याचे दरपत्रक वकिलांनी आपल्या कार्यालयात लावण्यासाठीच्या आदेश व्हावे, अशी मागणीही आ. रावल यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या