Friday, April 26, 2024
Homeराजकीयआजपासून काँग्रेसची सर्व जिल्ह्यात आझादी गौरव पदयात्रा

आजपासून काँग्रेसची सर्व जिल्ह्यात आझादी गौरव पदयात्रा

मुंबई Mumbai / प्रतिनिधी

देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Nectar festival of freedom) साजरा होत असताना प्रदेश काँग्रेसच्या (State Congress) वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ७५ किमीच्या आझादी गौरव पदयात्रेचे (Azadi Gaurav Padayatra) आयोजन करण्यात आले आहे. आज, ९ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी पदयात्रेचा प्रारंभ होत असून १४ तारखेला पदयात्रेचा समारोप होईल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) हे सेवाग्राम (Sevagram) येथून पदयात्रेचा शुभारंभ (Commencement of the walk) करणार आहेत.

- Advertisement -

नाना पटोले हे १० रोजी बुलढाणा जिल्हा काँग्रेस समितीने आयोजित शेगाव येथून पदयात्रेत सहभागी होतील. याशिवाय पटोले हे ११ ऑगस्टला, १२ ऑगस्टला नाशिक, १३ ऑगस्टला नागपूर तर १४ तारखेला पुणे शहर आणि जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने आयोजित पदयात्रेत आगा खान पॅलेस येथून सुरु होणाऱ्या पदयात्रेत सहभागी होतील.

स्वातंत्र्य चळवळीतील काँग्रेस पक्षाचे योगदान आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाच्या जडणघडणीत पंडित जवाहरलाल नेहरु ते डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने दिलेले योगदान याची माहिती जनतेला देण्याचा प्रयत्न या पदयात्रेतून केला जाणार आहे.

स्वातंत्र्याच्या या गौरवशाली इतिहासाची आठवण या निमित्तीने केली जाणार असून नवीन पिढीला त्याची माहिती व्हावा यासाठी पदयात्रेत जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती प्रदेश कॉंग्रेसच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या