Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; म्हणाले...

नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; म्हणाले…

मुंबई | Mumbai

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीसह भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिवंगत शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने पक्षचिन्ह मिळूनही उमेदवार उभा केलेला नाही. या ठिकाणी भाजपाने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे.

- Advertisement -

या सर्व पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. “रमेश लटके यांचा मातोश्रीत कितीदा अपमान झाला हे मला माहिती आहे. उद्धव ठाकरे हे त्यांचा फोनही घेत नव्हते. माणूस जिवंत असताना त्याला किंमत दिली नाही. मृत्यूनंतर घाणेरड्या राजकारणासाठी वापर करून घेतला जात आहे. आज लटके जिवंत असले तर ते एकनाथ शिंदेंसोबत गेले असते असा दावा नितेश राणे यांनी केला.

तसेच, “सहानुभूतीची भाषा करणारे जे आहेत. त्यांनी वांद्रे विधानसभेत दिवंगत बाळा सावंतांच्या पत्नी तृप्ती सावंत यांचे फोनही घेणे बंद केले होते. भेटायचे बंद झाले. निवडणुकीपुरता त्यांचा वापर करण्यात आला. ऋतुजा लटकेंबाबतही असेच होणार आहे. मातोश्रीत कोणाला किती इज्जत मिळते हे सगळ्यांना माहिती आहे. आदित्य ठाकरे यांनी म्याव म्याव केली तर त्यासाठी प्रत्येक औषध माझ्याकडे आहे,” असा इशारा त्यांनी दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या