Sunday, April 28, 2024
Homeराजकीयपरमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बने राजकारण तापलं!

परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बने राजकारण तापलं!

मुंबई | Mumbai

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला एक पत्र पाठवले असून या पत्रात परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. या पत्रानंतर महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या आरोपानंतर विरोधकांनी सरकारला आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना धारेवर धरलं आहे.

- Advertisement -

भाजप नेते राम कदम यांनीही शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ट्विटवर शायराना अंदाजात टीका केली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नार्को टेस्टची मागणी करत त्यांनी वसुलीतील वाटाबाबतही प्रश्न उपस्थित केला आहे. राम कदम यांनी म्हंटल आहे की, ”मेरे टूटे हुए दिल से कोई तो आज ये पूछे के तेरा हाल क्या है के तेरा हाल क्या है मेरे टूटे… किस्मत तेरी रीत निराली, ओ छलिये को छलने वाली फूल खिला तो टूटी डाली जिसे उलफ़त समझ बैठा, क्यूं मेरी नज़रों का धोखा था किसी की क्या खता है मेरे टूटे… माँगी मुहब्बत पाई जुदाई, दुनिया मुझको रास न आई, पहले कदम पर ठोकर खाई, सदा आज़ाद रहते थे हमें मालूम ही क्या था मुहब्बत क्या बला है मेरे टूटे…’

तसेच राम कदम यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, तेथे हिस्सेदारी होती का? हे कधी सांगणार? मोठा उद्योगपती यापुढे महाराष्ट्रात सुरक्षित नाही. आता येणाऱ्या काळात महाराष्ट्रात नवीन उद्योग आणण्याचे धाडस कुठल्या उद्योगपतीला शक्य होईल काय? दुर्दैवाने याच उत्तर नाही असं आहे. या सरकारने कोट्यवधी गरीबांचे रोजगार काढून घेतले आहेत. मंदिरांपूर्वी बिअर बार उघडण्याची घाई करण्याचे कारण आज सर्वांना माहिती पडलं. दुर्दैवाने, जर तुम्हाला देशातील संताची मागणी आणि पालघरच्या संतांची ओरड ऐकू येत नसेल, तर तुम्ही कोणीही संतांच्या शापातून सुटू शकणार नाही. दैवी न्यायापासून कोणीही सुटू शकत नाही.’ अशी टीका त्यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी काय म्हंटलं?

या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारमधील सर्व घटकांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला.

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, ‘सचिन वाझे प्रकरण आणि परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे राज्य सरकारवर शिंतोड उडाले आहेत. त्यामुळे आता सरकारमधील मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत का, ते तपासून पाहायला हवं. सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पोलीस खाते हे राज्याचा कणा असतो. स्वाभिमानाचे प्रतिक असते. हा कणा राज्यकर्त्यांनी मजबूत ठेवायचा असतो. सध्याची परिस्थिती पाहता काहीतरी दुरुस्त करावं लागेल तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायम सरकारची प्रतिमा चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गोष्टी घडल्या. या सगळ्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे होते. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. जगभरात सत्तास्थानी बसल्यावर अनेकांना आपण शहाणं असल्याचं वाटायला लागतं, हे या प्रकरणाच्या निमित्ताने दिसून आलं. या सगळ्या प्रकरणात शरद पवार योग्य भूमिका आणि निर्णय घेतील. मी आज दिल्लीत जाणार आहे. त्यावेळी शरद पवार यांच्याशी या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करेन, असं राऊत यांनी सांगितले.

या प्रकरणात अमृता फडणवीस यांनी उडी घेत सरकारवर निशाणा साधलाय. अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करत सरकारचा आणि गृहमंत्री अनिल देशमुख समाचार घेतला आहे. अमृता फणवीस यांनी नाव न घेता एका ट्विट केलं आहे. ‘बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी, बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ?” असं ट्विट त्यांनी केलंय. यात कुणाच्या नावाचा उल्लेख नसला तरी त्यांनी हॅशटॅगमध्ये #SachinWaze #SachinVaze #Target100Cr असं म्हंटलं आहे.

या संपूर्ण प्रकरणावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक पत्रक जाहीर करुन आपली बाजू मांडली आहे. तसेच परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे असून त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे.

अनिल देशमुखांनी पत्रकात म्हंटलं आहे की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वत:चा बजाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. पुढील महत्वाच्या गोष्टींवर मी आपले लक्ष वेधू इच्छितो त्यावरुन परमबीर सिंग हे कसे खोटे बोलत आहेत, ही बाब आपल्या लक्षात येईल. सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंग एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचवेळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही? आपणास उद्या म्हणजे दिनांक १७ मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरुन हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी दिनांक १६ मार्च रोजी पाटील यांना व्हॉट्सअॅप चॅट वरुन काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळवली. हा परमबीर सिंग यांच्या मोठ्या कटाचा भाग होता. या चॅटच्या माध्यमातून परमबीर सिंग यांना पद्धतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या चॅटवरुन उत्तरे मिळवताना परमबीर सिंग किती अधीर झाले होते हे त्यांच्या चॅटवरुन आपल्या लक्षात येईल. परमबीर सिंग हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहोत. याचा अर्थ काय?. पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाझे आणि एसीपी संजय पाटील हे परमबीर सिंग यांच्या अत्यंत जवळचे आहेत. १६ वर्षे निलंबित असलेल्या वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमबीर सिंग यांनी स्वत:च्या अधिकारात घेतला. परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे आहेत त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. मी त्यांच्यावर अब्रुनकसानीचा खटला दाखल करत आहे.’ असे त्यांनी म्हंटल आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या