Saturday, April 27, 2024
Homeराजकीयइतरांच्या भानगडी बाहेर काढल्या तर विषय खूप लांब जाईल- अजित पवार

इतरांच्या भानगडी बाहेर काढल्या तर विषय खूप लांब जाईल- अजित पवार

पुणे |प्रतिनिधी| Pune

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याची तक्रार संबंधित महिलेने दबावाने मागे घेतल्याचा आरोप विरोधी पक्ष करीत आहेत.

- Advertisement -

यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच संतापले. आता जर इतरांच्या भानगडी बाहेर काढल्या तर विषय खूप लांब जाईल, कशाला खोलात जाण्यास सांगताय’, अशा शब्दांत अजित पवार यांनी भाजपाच्या नेत्यांना इशारा दिला आहे.

पुणे जिल्हा नियोजनच्या आढावा बैठकीला पवार आले होते. तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा इशारा दिला. धनंजय मुंडे यांनी करुणा शर्माबाबत जे सांगायचं होतं ते त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. विरोधकांनी उगीच फाटे फोडू नये. कुणी काय काय लपवाछपवी केली, कुणाचे लग्न झाले होते, कुणाला किती मुलं होती.

लग्न झालं होतं की नाही झालं, कुणाच्या किती बायका आणि कुणी किती मुलं लपवली आहेत हे काय आम्हाला ठाऊक नाही का? असे प्रश्न उपस्थित करीत इतरांच्या भानगडी बाहेर काढल्या तर विषय खूप लांब जाईल, कशाला खोलात जाण्यास सांगताय’, असा इशारा त्यांनी दिला.

पंकजा मुंडे यांनी केलेल्या जातीनिहाय जनगणनेच्या प्रश्नावरदेखील पवारांनी भाष्य केले. जनगणना करायची की नाही हा निर्णय केंद्र सरकारचा आहे. तो लोकसभेचा अधिकार असून केंद्राने याबाबत निर्णय घ्यावा. लोकसभेतच ही मागणी झाली होती आणि ही खूप जुनी मागणी असल्याचे ते म्हणाले.

केंद्र सरकारने जनतेच्या मागण्या लक्षात घ्याव्यात. ओबीसी जनगणना, कृषी कायद्यांवर त्यांनी निर्णय घ्यावा. आम्ही राज्यात कृषी कायदे लागू करणार नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या