'मन की बात' कार्यक्रमानंतर राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका

राहूल गांधी यांनी ट्विट करत साधला निशाणा
'मन की बात' कार्यक्रमानंतर राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका

दिल्ली | Delhi

देशात करोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच सप्टेंबर मध्ये होणाऱ्या JEE परीक्षा होणार आहे. मात्र याला काँग्रेससह देशातील अनेक विरोधी पक्ष विरोध करत आहे. आज पंतप्रधानाच्या मन की बात(man ki baat) या कार्यक्रमानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी(congress leader rahul gandhi) ट्विट करत पंतप्रधानांवर टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे,"JEE-NEET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना वाटते की पंतप्रधानांनी परीक्षा वर चर्चा करायला हवी पण पंतप्रधान खेळण्यांवर चर्चा करत आहे."

पंतप्रधान मन की बात मध्ये बोलतांना म्हणाले, "खेळणी व्यवसाय खूप व्यापक आहे. गृह उद्योग असो, छोटे व लघु उद्योग असोत, MSMEs असोत, यात मोठमोठे उद्योग व खाजगी उद्योजकही त्याच्या अखत्यारीत येतात. या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी देशाला कठोर परिश्रम करावे लागतील. आपल्या देशात स्थानिक खेळण्यांची खूप समृद्ध परंपरा आहे. असे बरेच कुशल आणि कुशल कारागीर आहेत ज्यांना चांगली खेळणी बनविण्यात खास कौशल्य आहे. भारतातील काही क्षेत्रात Toy Clusters विकसित होत आहेत. उदाहरणार्थ, कर्नाटकमधील रामनगरममधील चन्नपटना, आंध्र प्रदेशातील कृष्णामध्ये कोंडापल्ली, तामिळनाडूमधील तंजोर, आसाममधील धुबरी, उत्तर प्रदेशमधील वाराणसी अशा अनेक ठिकाणं आहेत. पण आता विचार करा की, ज्या राष्ट्राकडे एवढी जुनी परंपरा, विविधता आहे. तरूण लोकसंख्या आहे... पण तरीही देशातील बाजारात भारतीय बनावटीची खेळणी कमी असणं किंवा त्यांचं उत्पादन कमी असणं हे आपल्याला योग्य वाटतंय का?' असं मोदी म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com