मुंबई | Mumbai
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना ऐन दसरा मेळाव्याच्या तोडांवर वरळीमध्ये मोठा धक्का बसला आहे. वरळीमधील शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. वरळी कोळीवाड्यातून जवळपास ५०० कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत कोळी बांधवांनी वर्षा या निवासस्थानी जात प्रवेश घेतला. दसरा मेळाव्याच्या तोडांवर आदित्य ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
‘आदित्य ठाकरेंना मिळणाऱ्या धक्क्यांची ही सुरुवात आहे. यानंतर त्यांना आणखी मोठमोठे धक्के बसतील’, असा इशारा शिंदे गटातील नेते किरण पावसकर यांनी दिला आहे. ‘वरळीत अनेक समस्या आहेत. उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते, आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री होते, तरीही हे प्रश्न सुटू शकले नाहीत. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संताप होता,’ असे पावसकर म्हणाले आहेत.