गंगापूर धरण क्षेत्रात गेल्या २ दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. सकाळी साडेआठ वाजेपासून टप्प्याटप्प्याने विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे बुधवारी दुतोंड्या मारुती पाण्यात बुडाला. अनेक दुकाने, मंदिरे पाण्यात गेली होती. परिसरातील व्यावसायिकांची दुकाने हलवण्यासाठी धावपळ उडाली. परंतु दुसऱ्या दिवशी पूर ओसरताच गोदाकाठ पुन्हा गजबजला. सर्व व्यवहार सुरुळीत सुरु झाले.
बुधवारी सुरक्षित स्थळी नेलेली दुकाने पुन्हा जागेवर आणून विक्रेत्यांनी व्यवहार सुरु केले. रामकुंडावर धार्मिक विधी सुरु झाले. गोदावरीच्या पाण्यात मुले पोहण्याचा आनंद घेऊ लागली.
- Advertisement -
अनेकांनी आपली वाहने धुण्यासाठी गोदावरी काठावर मोर्चा वळवला. पाण्यात मोटार सायकल, रिक्षा धुत असतांना सुरक्षा रक्षक कोणालाही अटकाव करत नव्हते.