निसर्गसृष्टीचे सौंदर्य सध्या सर्वत्र बहरलेले दिसून येत आहे. हे विलोभनीय व मनमोहक ठिकाणी सध्या नागरिक गर्दी करू लागलेले आहेत. नाशिक जिल्ह्यात अशी ठिकाणे खूप आहेत, सुट्टी साजरी करावयाची असली कि पावसाळ्यात वेगवेगळ्या ठिकाणी नागरिक भेटी देऊन आपली सुट्टी साजरी करतात.
असेच वातावरण पेठ तालुक्यातील बिलकस येथेही निर्माण झाले आहे. येथील नदीपात्रात तयार झालेल्या लहान धबधब्यात नायगारा सारखा फील आल्याशिवाय राहत नाही.
अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल असलेल्या या परिसरात निसर्गसौंदर्याचा अविष्कार असला तरीदेखील याठिकाणी पर्यटक अजून फिरकलेले नाहीत.
(सर्व छायाचित्रे : सुनील धोंडगे, पेठ तालुका प्रतिनिधी)