मुंबई | Mumbai
राज्यातील पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी हलका, मध्यम ते मुसळधार स्वरुपात पाऊस (Maharashtra Rains Updates) कोसळतो आहे.
पश्चिम महाराष्ट्र (Paschim Maharashtra), कोकण (Konkan), उत्तर महाराष्ट्र, विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाडा (Marathwada) अशा सर्व विभागांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस आहे.
अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे गावे, शहरे आणि परिसर पाण्यात गेली आहेत. प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून येथे आजवरच्या इतिहास प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर महापूर पाहायला मिळत आहे.
या शिवाय रायगड जिल्ह्यातील महाड शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. रायगडमध्ये मुसळधारपावसामळे पाच जण ठार झाल्याची माहिती आहे. तर कोल्हापूर, सांगली यांसारख्या नदीकाटच्या शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.