<p><strong>दिल्ली | Delhi </strong></p><p>संपूर्ण उत्तर भारतात सध्या कडाक्याची थंडी पडलीय. सर्वात कठीण परिस्थिती जम्मू-काश्मीरमध्ये दिसून येत आहे.</p>.<p>जम्मू-काश्मीर किमान तापमान शून्य अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.</p>.<p>जम्मू-काश्मीरच्या विविध भागात सध्या बर्फवृष्टी सुरू असून संपूर्ण काश्मीरवर जणू पांढरी चादर पसरली गेली आहे.</p>.<p>जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांचे आकर्षण असणारा दल तलावही गोठून गेला आहे. गेल्या २९ वर्षांतील हि सर्वात मोठी बर्फवृष्टी मानली जात आहे.</p>.<p>यामुळे येथील दृश्य खूप मनोहारी झाले आहे. दल तलाव गोठल्याने त्यावर उभा राहता येईल अशी येथील अवस्था सध्या झाली आहे..</p>.<p>पण यासोबतच तेथील जनजीवन मात्र विस्कळीत झाले आहे. श्रीनगरमध्ये कमीतकमी तापमान झाल्याने याठिकाणी पाणीपुरवठा करणारे पाईप्सही गोठले आहेत. </p>