करोना संकटाच्या काळात बिहारमध्ये आज पहिल्या टप्प्यातील निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यात १६ जिल्ह्यातील ७१ जागांवर मतदान होत आहे.
हे मतदान करोनाच्या संकटात सुरक्षित व्हावं यासाठी वेळोवेळी खबरदारी घेतली जात आहे. सॅनिटायझेशनचेही काम सुरू आहे.
करोनाच्या सावटामध्ये भारतामध्ये बिहार हे पहिलेच राज्य आहे जेथे मतदान होणार आहे.
सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत नागरिकांनी मतदान करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात आज ७१ विधानसभा जागांसाठी सुमारे १ हजार ६६ उमेदवारांसाठी हे मतदान होत आहे.
बिहारमध्ये 71 जागांसाठी आज सुमारे 2 कोटी 14 लाख नागरिक आपलं मत नोंदवू शकतात.
या निवडणुकीतील मुख्य स्पर्धा एनडीए आणि महायुती यांच्यात आहे. परंतु काही जागांवर ही लढतही तिहेरी होण्याची शक्यता आहे.