नाशिक | प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात मोठ्या संख्येने पर्यटकांची गर्दी होत आहे. भावली धरण ओसंडून वाहत असून या परिसरातील निसर्गसौंदर्य सध्या नाशिक, मुंबई परिसरातील पर्यटकांना सुट्टी घालविण्याचे जणू ठिकाणच बनले आहे.
मुंबई-आग्रा महामार्गापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प आहे. डोंगरांच्या मधोमध जलाशय असल्याने त्याचे सौंदर्य अनोखेच आहे. जलाशयातील निळेशार पाणी आणि दुसऱ्या बाजूस असणारा धबधबा क्षणात मोहून टाकतो.
कपारीतून कोसळणाऱ्या धबधब्याचे सौंदर्य टिपण्याची मजा काही औरच असते. पावसाळ्यात तर हा निसर्ग अनेकांच्या पसंतीस उतरतो.