जळगाव – Jalgaon
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी महामार्गावर आकाशवाणी चौकात विना परवानगी चक्का जाम आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.
- Advertisement -
आंदोलनातील भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा दिप्ती अश्वीन चिरमाडे (४२,रा.रिंगरोड, जळगाव), नगरसेविका उज्ज्वला किरण बेंडाळे (४३,रा.रामानंद नगर), रेखा लक्ष्मीनारायण वर्मा (५२), भाग्यश्री सुभाष चौधरी (६०) व लताबाई बाविस्कर (३८) यांना जिल्हा पेठ पोलिसांनी शनिवारी दुपारी अटक करुन सुटका केली.
याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात संबंधित पाच महिलांविरुध्द मुंबई पोलीस कायदा ६८, ६९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.