Video क्रांतीदिन विशेष : नंदुरबारमधील ही पाच बालके अशी झाली शहीद
नंदुरबार – Nandurbar
- Advertisement -
निवेदन : राकेश कलाल, मुख्य उपसंपादक नंदुरबार
दि.८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना दिलेल्या ‘चले जाव’च्या नार्याला प्रतिसाद देत नंदुरबारातील बालकांनी ९ सप्टेंबरला मोर्चा काढला. या मोर्चाला ब्रिटीश अधिकार्यांनी विरोध केला होता. मात्र, तरीही बालकांनी मोर्चा काढल्याने त्यांच्यावर अमानुष गोळीबार करण्यात आला. यात शिरीषकुमार मेहता, धनसुख शहा, शशिधर केतकर, घनशाम शहा, लालदास बुलाखीदास ही कोवळी बालके शहिद झाली. या बालशहिदांच्या स्मृतीनिमित्त नंदुरबारातील माणिक चौकात स्मारक उभारण्यात आले आहे. हे स्मारक आजही या बालशहिदांच्या क्रांतीची आठवण करुन देते.