औरंगाबाद – aurangabad
शहरातील उस्मानपुरा (Usmanpura) भागात एक आगळेवेगळी घटना समोर आली असून, पाच रुपयांच्या (Gutkha) गुटख्यामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. तोंडात गुटखा टाकल्यानंतर ठसका लागला ज्यामुळे या व्यक्तीचा (Death) मृत्यू झाला आहे. गणेश जगन्नाथ दास (वय ३७, रा.पद्मपाणी, रेल्वे स्टेशन) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
गणेश हा एका (Private company) खाजगी कंपनीत कामाला होते. दरम्यान कंपनीच्या मालकाच्या घरी डिश टीव्ही बसवण्यासाठी ते गेले होते. गणेश यांना गुटखा खाण्याची सवय असल्याने डिश टीव्ही (Dish TV) बसवत असताना त्यांनी गुटख्याची पुडी फोडून ती तोंडात घातली. याचवेळी त्यांना जोरोचा ठसका लागला आणि ते बेशुद्ध होऊन पडले. गणेश बेशुद्ध होऊन खाली पडताच त्यांना तात्काळ घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र (Doctor) डॉक्टरांनी गणेश यांना तपासुन मयत घोषित केले. शुक्रवारी शवविच्छेदनाचा अहवाल आला असून, गणेश यांच्या अन्ननलिकेत सुपारीचा खांड अडकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच समोर आलं आहे. याप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.