ऑकलंड | auckland
भारताने टी- २० मालिका जिंकल्यानंतर आज भारत आणि न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली. मात्र, या पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला आहे...
पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने शानदार फलंदाजीची करत 307 धावांचे आव्हान केवळ ४७.१ षटकांत तीन गडी गमावून पूर्ण केले. भारतावर 7 विकेट्सने न्यूझीलंडने विजय मिळवला.
यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेतही न्युझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आधी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय न्यूझीलंडने केला.
ज्यानंतर भारताने सलामीवीर शिखर धवन-शुभमन गिल यांच्या अर्धशतकांसह श्रेयस अय्यरच्या 80 धावांच्या जोरावर 306 धावा केल्या होत्या. मात्र न्यूझीलंडन सात गाडी राखत हा सामना जिंकला.