मुंबई | Mumbai
भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात मोहालीत येथे पहिला कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारताने मोठा विजय मिळवला असून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
भारताने पहिल्याच डावात ५७४ धावा केल्या. सामन्याच्या पहिल्या दिवशीपासून भारताचं पारडं जड दिसत असल्यानं अखेर भारतानचं एक डाव आणि 222 धावांनी एका मोठ्या विजयाची नोंद केली आहे. यावेळी भारताकडून रवींद्र जाडेजा याने अष्टपैलू कामगिरी केली. एका डावात नाबाद १७५ धावांसह दोन डावांत एकूण ९ विकेट्स त्याने घेतल्या आहेत.
पहिल्या डावात डोंगराएवढे लक्ष्य ठेवल्यानंतर श्रीलंकेचा पहिला डाव १७४ धावांत आटोपला. कॅप्टन्सीच्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने प्रतिस्पर्ध्यांना फॉलोऑन दिला. त्यानंतर श्रीलंकेने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. यावेळीही श्रीलंकन फलंदाजांना मैदानात तग धरता आला नाही.