दुबई | Dubai
२०२१ मधील सर्वोत्तम ट्वेन्टी-२० संघांच्या निवडीची घोषणा आयसीसीकडून (ICC) करण्यात आली आहे. यात भारताच्या (India) एकाही क्रिकेटपटूला स्थान देण्यात आले नाही. पाकिस्तानच्या (Pakistan) बाबर आझमला (Babar Azam) या ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे...
बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानने ट्वेन्टी-२० विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. शिवाय त्याने २०२१ मधील २९ सामन्यांमध्ये ३७.५६ च्या सरासरीने ९३९ धावा केल्या होत्या. यामध्ये एक शतक व नऊ अर्धशतकांचा समावेश होता.
विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाला (Indian Cricket Team) ट्वेन्टी-२० विश्वकरंडकात साखळी फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला होता. या निराशाजनक कामगिरीचा फटका भारतीय क्रिकेटपटूंना बसला आहे.
आयसीसीकडून निवडण्यात आलेल्या या संघात पाकिस्तानच्या तीन खेळाडूंचा समावेश आहे. यात बाबर, महम्मद रिझवान व शाहीन आफ्रिदीचा समावेश आहे. तसेच मिचेल मार्श व जोश हेझलवूड या दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंनादेखील स्थान देण्यात आले आहे.
असा आहे ट्वेन्टी-२० संघ
जोस बटलर, महम्मद रिझवान, बाबर आझम, एडन मार्करम, मिचेल मार्श, डेव्हीड मिलर, तबरेझ शम्सी, जोश हेझलवूड, वनींदू हसारंगा, मुस्तफिजुर रहमान, शाहीन आफ्रिदी.