
मुंबई | Mumbai
भारत आणि वेस्टइंडिज (India and West Indies) यांच्यात आज पहिला वनडे सामना ( ODI Match) होणार असून या लढतीसाठी भारतीय संघ रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वाखाली मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. परंतु, त्याअगोदर भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे...
भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजची (Mohammad Siraj) वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड झाली होती. मात्र, त्याला संघ व्यवस्थापनाने अचानक विश्रांती देण्याचा निर्णय घेतल्याने तो मायदेशी परतला आहे.
नुकत्याच वेस्ट इंडिजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेनमध्ये ड्रॉ झालेल्या कसोटीत सामन्यात मोहम्मद सिराजने विकेट घेतल्या होत्या. तसेच त्याला पहिल्यांदा कसोटीत (Test) 'प्लेअर ऑफ द मॅच' चा पुरस्कार देखील मिळाला होता. तर डॉमनिका कसोटीत त्याने २ विकेट घेतल्या होत्या. परंतु, संघ व्यवस्थापनाने त्याच्यावरील ताण कमी करण्यासाठी वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिकेतून विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, मोहम्मद सिराज मायदेशी परतल्याने त्याच्या जागी पर्यायी खेळाडू म्हणून कुणाला संघात संधी द्यावी असा प्रश्न कर्णधार रोहित शर्मासमोर निर्माण झाला आहे. तर सिराजचा बदली खेळाडू म्हणून मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, शार्दूल ठाकूर, उमरान मलिक, हार्दिक पांड्या यापैकी एकाला संधी मिळू शकते.
सलिल परांजपे, नाशिक