IND vs NZ 2nd ODI : न्यूझीलंड विरुद्ध मालिका जिंकण्याच्या भारताच्या आशा संपल्या, कारण...

IND vs NZ 2nd ODI : न्यूझीलंड विरुद्ध मालिका जिंकण्याच्या भारताच्या आशा संपल्या, कारण...

दिल्ली | Delhi

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रविवारी हॅमिल्टन येथे खेळवला जाणार होता. भारतासाठी हा सामना करो या मरो अशा प्रकारचा असणार होता. हा सामना गमावल्याने भारतीय संघ मालिकाही गमावेल अशी परिस्थिती होती.

मात्र आता हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. हॅमिल्टनच्या मैदानावर आज सकाळपासून पाऊस पडत होता. सामना सुरू होण्यापूर्वी पाऊस थांबला असला तरी ओल्या मैदानामुळे टॉसला उशीर झाला. पावसाने सामन्यात प्रचंड व्यत्यय आणला.

पहिल्या 4.5 षटकांनंतर पाऊस आला आणि नंतर काही तासांनंतर सामना पुन्हा सुरू झाला, जो 29-29 षटकांचा होता, परंतु 12.5 षटकांनंतर पावसाने खेळ खराब केला. पंच आणि सामनाधिकारी यांना सामना रद्द करण्यास भाग पाडले.

कारण तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना भारताने आधीच गमावला आहे. त्यातच दुसरा सामना रद्द झाल्याने मालिकेत आव्हान टिकवण्यासाठी भारताला तिसऱ्या सामन्यात विजय आवश्यक आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com