Thursday, April 25, 2024
HomeUncategorized'३५' मिसळ खाण्याच्या कल्पनेनेच कसंतरी झालं; रोहित पवारांनी उडवली फडणवीसांची खिल्ली

‘३५’ मिसळ खाण्याच्या कल्पनेनेच कसंतरी झालं; रोहित पवारांनी उडवली फडणवीसांची खिल्ली

मुंबई | Mumbai

झी मराठीवरील किचन कल्लाकार या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमात अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना देवेंद्रजी एका बैठकीत किती पुरणपोळ्या खाऊ शकतात, असा प्रश्न विचारण्यात आला होता…

- Advertisement -

त्यावर मिसेस फडणवीस म्हणाल्या की, ते ३०-३५ पुरणपोळ्या सहज पातेलंभर तुपासोबत खायचे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली आहे…

आमदार रोहित पवार यांनी आज कर्जत-जामखेडच्या दौऱ्यावर (Karjat-Jamkhed Tour) आहेत. माही जळगावातील हॉटेल राहुलमध्ये (Hotel Rahul) त्यांनी कार्यकर्त्यांसोबत मिसळीचा आनंद घेतला.

मिसळ खातानाचे फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, एकाच मिसळमध्ये पोट भरल्याने ‘३५’ मिसळ खाण्याच्या केवळ कल्पनेनेच कसंतरी झालं, अशा शब्दात रोहित पवार यांनी फडणवीसांची खिल्ली उडवली आहे.

तसेच ठाण्यातील एका हॉटेलमध्ये रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि कपिल पाटील (Kapil Patil) यांनी वडापाववर ताव मारला होता. परंतु वडापावचे बिल न देताच हे नेते निघून गेल्याची जोरदार चर्चा सुरु झाली.

हायकोर्टाने फटकारले! वानखेडेंची याचिका सुनावणीला आलीच कशी?

त्यावरदेखील रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे. त्याच ट्विटमध्ये रोहित पवार पुढे म्हणाले की, आणि हो… मिसळ खाल्ल्यानंतर पैसे न देताच उठून गेलो नाही तर नेहमीप्रमाणे बिलही पेड केलं, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या