Monday, April 29, 2024
HomeUncategorizedथकबाकीदारांचा वीजपुरवठा होणार  खंडित!

थकबाकीदारांचा वीजपुरवठा होणार  खंडित!

औरंगाबाद – aurangabad

महावितरण शहर मंडळ अंतर्गत छावणी, पावर हाऊस , हर्सूल, शहागंज, सिडको, चिकलठाणा, गारखेडा, क्रांती चौक या उपविभागामधील घरगुती ग्राहकांनी अनेक महिन्यांपासून वीज देयकाची भरणा न केल्याने मोठ्या प्रमाणात थकबाकीचा डोंगर साचला आहे. त्यामुळे २० ते २५ ऑगस्ट २०२२ या काळात थकीत बिल असणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा (Power supply) खंडित करण्याची कार्यवाही महावितरणकडून करण्यात येणार आहे.

- Advertisement -

महावितरणला वीज बिलाच्या (electricity bill) प्रचंड थकबाकीमुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीज ग्राहक वापरलेल्या वीज बिलाचा भरणा न केल्यामुळे थकबाकीचा डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे. वीज ग्राहकांनी बिलाचा भरणा करावा यासाठी महावितरणकडून एसएमएसद्वारे सूचना देणे, भेटीद्वारे बिल भरण्याचे आवाहन करणे, पत्रव्यवहार करणे, देय दिनांकापूर्वी वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांसाठी बक्षीस योजना राबवणे आदीद्वारे ग्राहकांना संपर्क करून जनजागृती करण्यात येत आहे.

बिल तयार झाल्याच्या सात दिवसांत बिल भरल्यास जवळपास एक टक्के तत्पर देयक भरणा सूट मिळते. तसेच ऑनलाईन बिल भरल्यास ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सूट महावितरणतर्फे देण्यात येत आहे. तरीही काही घरगुती ग्राहक दरमाह वीज बिल भरण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे महावितरणला वीज बिल वसुलीसाठी कडक धोरण अवलंबून २० ते २५ ऑगस्ट या कालावधीत ग्राहकांकडे थकबाकी भरून घेणे, अथवा त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या सक्त सूचना संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. वीज ग्राहकांनी चालू वीज बिलासह थकबाकीचा भरणा करण्याचे आवाहन महावितरण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या