दिल्ली | Delhi
करोनाच्या साथीच्या काळात सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना 30 सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या यूजीसीच्या निर्देशास आव्हान करणार्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने 10 ऑगस्टपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे.
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना गृह मंत्रालयाची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. या निर्णयाकडे देशातील अनेक विद्यार्थ्यांसह पालकांचे याकडे लक्ष लागले आहे.