नवी दिल्ली -
भारतीय रेल्वेत 1 लाख 40 हजारांपेक्षा जास्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी रेल्वेभरती मंडळ तीन टप्प्यात मोठी मोहीम
राबवत असून, त्यासाठी देशभरातून 2 कोटी 44 लाखाहून अधिक उमेदवार परीक्षा देणार आहेत.
पहिल्या टप्प्यातली परीक्षा येत्या 15 ते 18 डिसेंबर दरम्यान होणार आहे. दुसर्या टप्प्यातली परीक्षा 28 डिसेंबरला सुरु होणार असून, अंदाजे येत्या मार्चपर्यंत चालेल, तर तिसर्या टप्प्यातली परीक्षा एप्रिल ते जून 2021 या काळात होईल, असं रेल्वेमंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे.
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या मोठ्या भरती करता रेल्वेमंडळानं मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. करोनापासून बचावासाठी आवश्यक नियमांचं पालन करत दररोज दोन सत्रांमधे ही परीक्षा होणार आहे.