राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात

राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात

नवी दिल्ली

काँग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर सातत्याने टीका करतात. गुरुवारी श्रम विधेयकावरुन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात केला आहे.

खासदारांच्या निलंबनावरुन विरोधकांचा मोदी सरकारवर बहिष्कार सुरु असताना अधिवेशन संपण्यापुर्वी कामगार कायद्यात दुरुस्त्या करण्याविषयी श्रम विधेयक संसदेत मांडले होते. या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. यानंतर राहुल गांधींनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

हे विधेयक मंजूर झाल्यानंतर टि्वट करत राहुल म्हणाले की, ‘शेतकऱ्यांनंतर कामगारांवर वार, गरीबांचे शोषण, मित्रांचे पोषण, हेच आहे मोदीजींचे शासन' या ट्वटिमध्ये त्यांनी एका बातमीचा फोटोही जोडला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com