<p><strong>नवी दिल्ली - </strong></p><p><strong> </strong>नवे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी गेल्या अडीच महिन्यांपासून शेतकर्यांचे दिल्लीत आंदोलन सुरु आहे. दरम्यान नव्या कृषी कायद्यांविरोधातील </p>.<p>आंदोलन अजून तीव्र करण्याचा निर्णय शेतकरी नेत्यांनी घेतला आहे. त्यानूसार येत्या 18 फेब्रुवारीला देशव्यापी रेल रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी 12 ते 4 असे चार तास हे आंदोलन केलं जाणार आहे. आंदोलनाचा भाग म्हणून आंदोलनकर्त्यांनी 12 फेब्रुवारीपासून राजस्थानाच्या रस्त्यांवरील सर्व टोल वसुली करु न देण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी संयुक्त किसान मोर्चाची बैठक झाली त्यावेळी हे निर्णय घेण्यात आले.</p><p>संयुक्त किसान मोर्चाने प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, 14 फेब्रुवारीला देशभरात कॅण्डल मार्च आणि मशाल मोर्चा काढला जाणार आहे. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी हा मोर्चा काढला जाईल.</p>