टेकऑफवेळी विमान आदळलं धावपट्टीवर अन् पुढे घडलं असं काही...

टेकऑफवेळी विमान आदळलं धावपट्टीवर अन् पुढे घडलं असं काही...

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

कालिकतहून सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानाचे तिरुअनंतपुरम विमानतळावर आपतकालीन लँडिंग करण्यात आले आहे. या विमानात एकूण १८२ प्रवासी होते...

आज सकाळी एअर-इंडिया एक्सप्रेस IX 385 ने कालिकत येथून सौदी अरेबियाच्या दम्मामकडे उड्डाण भरले. मात्र, उड्डाणावेळी विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला. यामुळे विमानाच्या हायड्रोलिक गियरमध्ये बिघाड झाला. यानंतर या विमानाचे तिरुअनंतपुरममध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

यावेळी विमानात १८२ प्रवासी प्रवास करत होते. अचानक विमान तिरुअनंतपुरमकडे वळवण्यात आल्याने येथील विमानतळावर आणीबाणी घोषित करण्यात आली होती. टेकऑफवेळी विमानाच्या मागचा भाग धावपट्टीवर आदळला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

टेकऑफवेळी विमान आदळलं धावपट्टीवर अन् पुढे घडलं असं काही...
उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? कथित बंगलो प्रकरणी गुन्हा दाखल

यानंतर वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत विमानातील इंधन अरबी समुद्रात रिकामे केले. त्यानंतर तिरूअनंतपुरम येथील विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले. ज्यावेळी हे विमान तिरूअनंतपुरम विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी संपूर्ण विमानतळावर आणीबाणी लागू करण्यात आली होती. दरम्यान, वैमानिकाच्या प्रसंगावधाने मोठा अपघात टळला आहे.

टेकऑफवेळी विमान आदळलं धावपट्टीवर अन् पुढे घडलं असं काही...
आता WhatsApp वर पाठवलेला मेसेज करता येणार एडिट, जाणून घ्या कसे?
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com