नव्या कृषी कायद्यांवरून विरोधकांचा गदारोळ; कामकाज तहकूब

शेतकर्‍यांच्या मुद्यावर उद्या चर्चा
नव्या कृषी कायद्यांवरून विरोधकांचा गदारोळ; कामकाज तहकूब

नवी दिल्ली -

संसद अधिवेशनात विरोधकांनी नव्या कृषी कायद्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने दोन्ही सभागृहातील कामकाज

तहकूब करण्यात आले.

राज्यसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांनी शेतकर्‍यांच्या मुद्यांवर चर्चा व्हावी, यासाठी नोटीस दिली. तर बहुजन समाज पक्षाचे सदस्य अशोक सिद्धार्थ यांनी स्थगन प्रस्ताव दिला. मात्र, सभापती वैंकय्या नायडू यांनी उद्या शेतकर्‍यांच्या मुद्यावर चर्चा होईल, असे स्पष्ट केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करण्यावर सहमती झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. विरोधी बाकावरील सदस्य मात्र चर्चेच्या मुद्यावर ठाम राहिले आणि सभात्याग केला.

शेतकर्‍यांच्या मुद्यावरून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. यानंतर राज्यसभेचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले. राज्यसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिला. तीनवेळा कामकाज तहकूब केल्यानंतर अखेर साडेबारा वाजता राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. लोकसभेतही काँग्रेसकडून स्थगन प्रस्ताव

राज्यसभेप्रमाणे लोकसभेतही सदस्यांनी कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाचा मुद्दा उचलून धरला. लोकसभेतही अनेकदा कामकाज तहकूब करावे लागले. दरम्यान, काँग्रेसच्या संसदीय समितीची बैठक पार पडली. यामध्ये शेतकर्‍यांच्या मुद्यावरून स्थगिती प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी कायद्याचा प्रश्न चांगलाच गाजणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com