भारतीय मुस्लीम जगात सर्वाधिक समाधानी - मोहन भागवत

भारतात केवळ हिंदूंनाच राहण्याचा अधिकार असल्याचं राज्यघटनेत म्हटलेलं नाही
भारतीय मुस्लीम जगात सर्वाधिक समाधानी - मोहन भागवत

नवी दिल्ली -

जगात भारतीय मुस्लीम सर्वाधिक समाधानी आहेत, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी

म्हटले आहे. एका साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीवेळी ते बोलत होते.

तेे म्हणाले, मुघल सम्राट अकबराविरुद्ध महाराणा प्रताप यांचे सैन्य लढले, त्यामध्ये अनेक मुस्लिमांचा समावेश होता. देशाच्या संस्कृतीवर जेव्हा हल्ला होतो तेव्हा सर्वधर्मीय एकत्र येतात, भारताने अन्य धर्मीय अनुयायांना हक्क दिले, तसे पाकिस्तानने दिले नाहीत आणि मुस्लीमांसाठी स्वतंत्र देश निर्माण केला, भारतीय मुस्लीम सर्वाधिक समाधानी आहेत. इतकंच नव्हे तर देशाच्या संस्कृतीवर जेव्हा हल्ला होतो तेव्हा सर्वधर्मीय एकत्र येतात, ज्यांच्या स्वहिताला बाधा निर्माण होते तेव्हाच कट्टरतावाद आणि फुटीरतावाद पसरविला जातो,

एखाद्या देशावर राज्य करणारा विदेश धर्म अजुनही अस्तित्वात आहे असं उदाहरण फक्त भारतात बघायला मिळतं,

पुढे ते म्हणाले की, भारतात केवळ हिंदूंनाच राहण्याचा अधिकार आहे किंवा इथे फक्त हिंदूचंच म्हणणे ऐकून घेतले जाईल, तसंच जर तुम्हाला भारतात राहायचं असेल तर हिंदूंचं वर्चस्व मान्य करावं लागेल असं आपल्या राज्यघटनेत म्हटलेलं नाही. कारण आपली संस्कृती आहे आणि ती संस्कृती म्हणजे हिंदू आहे.

मोहन भागवत यांनी यावेळी अयोध्या राम मंदिरासंबंधी बोलताना ते राष्ट्रीय भावनांचे मंदिर आहे, मानवतेचं मंदिर आहे असं सांगितलं.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com